तुझं माझं नातं निरंतर टिकवून ठेवायचं
असंच आपलं ठरलं होतं ना...
आपल्या प्रेमाचा गोडवा कायम राखून ठेवायचा
असंच आपलं ठरलं होतं ना...
मग का तू माझ्यावर रागावलीस ?
मला एकट्याला सोडून निघून गेलीस ?
एकानं रुसलं तर दुसऱ्याने मनवायचं
असंच आपलं ठरलं होतं ना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा